हल्ली आढळणाऱ्या आधुनिक भाज्या पूर्वी बहुदा स्वयंपाकघरात क्वचित आढळायच्या. त्या वेळी रानावनातील रानभाज्यांचाच स्वयंपाक घरात राबता असायचा. हल्ली शोधूनही न सापडणाऱ्या रानभाज्या उदाहरणार्थ... कुड्या, बिरड्या, भोपळा, टाकळा, भारंगा, केनाकुर्डू, कोवळा, कुवाळू, अकुरा, घोळी, झरका, करटुली, पेंढरी, चिंचार्डी, वाघाटी आदी रानभाज्यांची रेसिपी आठवणीतील पाकस्मृती स्वादस्मृती या पुस्तकात देण्यात आल्या आहेत.
या शिवाय हल्ली विस्मरणात गेलेल्या अनेक चटण्या, तोंडीलावणीचे पदार्थ, भाज्या आदींची मांडणी पुस्तकात करण्यात आली आहे. मसूराची आमटी, कुलथ्याचे पिठले, वडीचे सांबार, मोहरवणी, गोळवणी, खमंग आरोळ्या, रुमाली वड्या, रताळ्याची सुतारफेणी, पुडाचे घावण, निनाव, बोटव्याचा साखरभात, ढोंढस आदी नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल पुस्तकात करण्यात आली आहे. लेखिका अनुपमा कुलकर्णी यांनी जाम आणि मुरांबे यांनाही न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय मांसाहारी आणि विदेशी पदार्थांच्याही पाककृती येथे देण्यात आल्या आहेत.
प्रकाशक : निचिता प्रकाशन
पाने : १६०
किंमत : २१० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)